कोकणातील सागरी पर्यटन करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.निसर्ग पर्यटन म्हणजे काय हे आंबोली घाटात गेल्यावर समजते.
आंबोली घाट
आंबोली सह्याद्रीच्या कुशीत वसलेला घाट रस्ता आहे. महाराष्ट्रातील महत्वाचा मार्ग आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला यांच्या मध्यस्ती आंबोली घाट आहे.
आंबोली घाट
याठिकाणी दाट जंगले, दर्या खोर्यांचा नयनरम्य देखावा, अमर्याद निसर्गसौंदर्य पाहता येते आणि घनदाट जंगलातून भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.
आंबोली घाट
आंबोली घाटाच्या जंगलात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे असे वन्य प्राणी पाहायला मिळतात.
आंबोली घाट
जंगल पर्यटन करण्यासाठी आंबोली घाट अतिशय सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी जैविक विविधता या ठिकाणी आढळून येते.
आंबोली घाट
महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगेत सर्वाधिक जास्त धबधबे, घाटवळणाचे रस्ते आंबोली घाटात आहे. यामुळे आंबोली घाट हा पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ बनलेले आहे.
आंबोली घाट
जवळच एक गुहा आहे. ही गुहा दोन ते तीन किलोमीटर लांब आहे.या गुहेत 7 तलाव आहेत. हिरण्यकेशी नदीच्या सोबत नांगरतास नावाचा धबधबा पाहायला मिळतो.
आंबोली घाट
आंबोलीत पावसाळयात भरपूर पाऊस पडतो. हिवाळा सुरू झाला की दिवसभर हवामान थंड असते. उन्हाळ्यामध्ये वातावरण गरम असते.
आंबोली घाट माहिती मराठी
आंबोली हे पावसाळ्यातील खास प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील धबधबे व जैवविविधता खूपच रमणीय आहे. अधिक माहितीसाठी आमचा लेख जरूर वाचा.